Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

12538 पदे – महाराष्ट्र पोलीस भरती 2020-2021

Maharashtra Police Bharti 2020-2021

Maharashtra Police Bharti 2020 – पोलिस भरतीत भोई, ढीवर जलतरणपटूंना हवे स्थान

Maharashtra Police Bharti 2020 : कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणाऱ्या पोलिसांना अनेकदा नदीत तलावात, विहिरीत बुडालेल्या लोकांना बाहेर काढावे लागते. अशावेळी पोलिस यंत्रणा स्थानिक मासेमार बांधवांची मदत घेते. कारण मासेमार कुठल्याही ठिकाणी पोहण्यात आणि मृतदेह शोधून काढण्यात तरबेज असतात.

महाराष्ट्रात १२ हजार ५३८ पदावर पोलिस भरती केली जाणार आहे. ही पोलिसांची भरती प्रत्येक ठाण्यात एकातरी भोई, ढीवर समाजातील जलतरणपटूंना भरतीत विशेष स्थान द्यायला हवे. संकटकाळात जेव्हा पाण्यात उतरण्याची वेळ येते, तेव्हा हाच भोई समाजातील जलतरणपटू पोलिसांच्या मदतीला येईल. वेळप्रसंगी कित्येकांचे जीवही वाचवण्यात त्यांची मदत होईल.

Maharashtra Police Bharti 2020

महाराष्ट्रात १० पोलिस आयुक्तालय आणि ३६ पोलिस अधीक्षक कार्यालय कार्यरत आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिस दलात आजच्या घटकेला सुमारे एक लाख ८४ हजार ७४५ कर्मचारी आहेत. तीन हजार ५३० पोलिस निरीक्षक आहेत. चार हजार ५३० सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. सात हजार ६०१ पोलिस उपनिरीक्षक आहेत. सुमारे २५० भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी कार्यरत आहेत. २७७ पोलिस अधीक्षक आहेत. ६५२ पोलिस उपअधीक्षक आहेत. एवढ्या मोठ्या पोलीस दलात आपत्ती व्यवस्थापनातही निपूण अशा कर्मचाऱ्यांची भरती होणे अनिवार्य नव्हे, काळाची गरज आहे.

महापुरात पाण्याच्या ठिकाणी भोई समाजातील किंवा ज्यांनी लहानपणी मासेमारीच्या माध्यमाने पाण्यात पोहण्याची कला आत्मसात केली. त्या भोई समाजातील मुलांची मदत एखाद्या पीडिताला वाचविण्यासाठी होईल किंवा मृतदेह काढण्यासाठीही त्यांची मदत होईल, असे अनेक दुरोगामी लाभ पोलिस दलात भरती झालेल्या भोई उमेदवाराकडून होतील.

दरम्यान जलतरणपटू अनेक असतात, पण मासेमार बांधव आपल्या मुलांना पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवायचे , एखाद्याचा मृतदेह नेमका कसा बाहेर आणायचा, याचेही शास्त्रशुद्ध शिक्षण बाळकडूच्या देतच असतात. ती पारंपरिक कला लक्षात घेता भोई समाजातील योग्य उमेदवारांना भरतीत स्थान दिल्यास आपली पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

आता होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्यातील पोलिस भरतीत काही पदावर निवडक जलतरणपटूंची प्राधान्याने निवड केल्यास पोलिस यंत्रणा अधिक सक्षम होईल, असे निवेदन मुख्यमंत्र्यासह गृहमंत्र्यांनाही पाठविलेले आहे.

सोर्स : सकाळ


Maharashtra Police Bharti 2020 is expected Soon for approximate 12 thousand vacancies in all over Maharashtra. The Details & Starting Date of police Bharti 2020 will be declared soon. For More Updates & Coming details about Police Bharti keep visiting us. As the Larger Number of candidates from all over Maharashtra are waiting for this recruitment from last year. Its really great news of Candidates.

Maharashtra Police Bharti 2020 : Police Bharti updates & Details More updates about the MahaPolice Bharti 2020. The More updates are given here. The official website under this bharti process details are given here. http://mahapolice.gov.in/ is the official website of this department. राज्य सरकार एकीकडे १० ते १२ हजार पोलिसांच्या भरतीची सातत्याने घोषणा करीत आहे. असे असताना दुसरीकडे तत्कालीन युती सरकारने पोलिस भरतीच्या बदललेल्या नियमांबाबतचे प्रकरण न्यायाधिकरणात प्रलंबित असून अजूनही त्यावर ठोस मार्ग निघालेला नाही. मात्र हा प्रश्नातून योग्य मार्ग काढण्यात येत असल्याचे सूतोवाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

असा केला आहे नियमात बदल
तत्कालीन युती सरकारने पोलिस दलातील शिपाई या पदाच्या भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल केला. त्यानुसार, शारिरीक चाचणीला पूर्वी असणाऱ्या 100 गुणाऐवजी 50 गुण केले, तर 50 गुणाची लेखी परीक्षा 100 गुणाची केली. त्याचबरोबर पूर्वी लेखी परिक्षेसाठी उमेदवाराचे प्रमाण एकास 15 इतके होते, ते नव्या नियमानुसार जादा गुण देण्याचा अध्यादेश काढला.

महाआघाडी सरकारकडुनही ठोस प्रयत्न नाही
तत्कालीन सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरातील गरीब, कष्टकऱ्याच्या कुटुंबातील मुलांची शारीरिक चाचणीमध्ये जादा गुण मिळवून स्पर्धेत टिकण्याच्या धडपडीवर देखील पाणी फिरल्याची टीका करीत राज्यातील लाखो उमेदवारानी पुण्यासह विविध जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्याकडून नव्या नियमामध्ये बदल करण्याची प्रक्रिया जलदगतीने होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही झाले नाही. विशेषत: खासदार सुप्रिया सुळे यांनीही उमेदवारांची भेट घेऊन हा प्रश्न राज्य सरकारपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न केले होते.

उमेदवार गेले “मैट”मध्ये, तरीही अद्याप निर्णय नाहीच
भीमराव शिरसीपुरकर आणि ज्योती सानी यांनी अ‍ॅड. श्रीकांत ठाकूर आणि अ‍ॅड.मुकुलानंद वाघ यांच्यामार्फत महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणामध्ये (मैट) याचिका दाखल केली होती. मैटने राज्य सरकारला 30 दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य सरकारने पोलिस भरतीत केलेले बदल योग्य आहे असे नमूद केले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या राज्यात राबविल्या जाणाऱ्या पद्धतीचा अहवाल दिला आहे. राज्य सरकारच्या या उत्तराला आता प्रतिउत्तर दिले जाणार असल्याचे अ‍ॅड. ठाकुर आणि अ‍ॅड. वाघ यांनी स्पष्ट केले.

” राज्य शासनाने दाखल केलेले शपथपत्र हे निव्वळ तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर आहे. सरकारने “मैट”मध्ये पोलिस भरतीचे बदल योग्य असल्याचे व बौद्धिक दृष्ट्या योग्य उमेदवार पोलिस म्हणून नेमायचे असल्याचे नमुद केले आहे. ही भूमिका म्हणजे कल्याणकारी राज्य संकल्पनेला तिलांजली आहे.”
– अ‍ॅड. श्रीकांत ठाकुर.

“पोलिस भरतीच्या नव्या नियमांबाबत दोन गट आहेत. त्यांची त्याविषयी वेगवेगळी बाजू आहे. सध्या हा विषय न्यायालयाच्या कक्षेत आहे. मात्र राज्य सरकार याबाबत योग्य मार्ग काढणार आहोत. त्यादृष्टिने पर्यायही निघेल.”
– अनिल देशमुख, गृहमंत्री.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

37 Comments
  1. Shraddha birmole says

    Police bharti ch form chi link kute aahe

  2. Vijay patil says

    12 pass la police bharti ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड